भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत   

नवी दिल्ली : भारतीय पुरुषांच्या रिले संघाने गुरुवारी सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली.  ४*४०० मीटर रिलेच्या भारतीय संघात धर्मवीर चौधरी, मोहीतकुमार, रिंच जोसेफ, मनू साजी यांनी जबदस्त कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारत भारताचे नाव उंचावले आहे. ही कामगिरी करताना भारतीय पुरुष रिले संघाने ३:०६.२८ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदविली. तर त्यानंतर चीनने ३:०६.७९ अशी वेळ नोंदविली. मात्र कोरियाने ३:१०.०५ अशी वेळ नोंदविली.आता अंतिम फेरीत श्रीलंका, चीन, श्रीलंका, कझाकिस्तान यांचा समावेश झाला आहे.  त्यामुळे आता भारतीय पुरुष संघाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आता भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत कशी कामगिरी करतो याकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष्य आहे. तसेच भारतीय संघाने पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवावे अशी अपेक्षा भारतीय चाहते करत आहेत. 
 
मिश्र रिलेलध्ये सुवर्णपदक
 
आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून इतिहास रचला. या स्पर्धेत भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाने ४*४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीय रिले संघाने जबरदस्त समन्वय आणि वेग दाखवत ३:१८.१२ सेकंदात शर्यत पूर्ण केली. 
 
भारतीय संघाकडून रूपल चौधरी, संतोष कुमार तमिलारासन, विशाल टीके आणि सुभा वेंकटेशन यांनी उत्तम कामगिरी केली. चारही धावपटूंनी उत्तम टीमवर्क दाखवले आणि सुरुवातीपासूनच भारताला शर्यतीत आघाडीवर ठेवले, ज्यामुळे निकाल भारताच्या बाजूने लागला.भारताने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले. याआधीही भारताने या खेळात सुवर्णपदक जिंकले.
 
शर्यत संतोष कुमारने सुरू केली. त्याने जलद सुरुवात केली आणि भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर त्याने रुपल चौधरीकडे बॅटन सोपवले, त्याला चिनी खेळाडूने चांगलीच टक्कर दिली. पंरतु, रुपल वेग कायम ठेवला आणि विशाल टीकेकडे बॅटन दिला. विशालने सुरुवात धीमी केली. पण नंतर त्याने वेग वाढवून भारताला आघाडी मिळवून दिली. शेवटच्या टप्प्यात धावणार्‍या सुभा वेंकटेशनने जबरदस्त संतुलन आणि वेग दाखवला आणि सुवर्णपदक भारताच्या खिशात घातले. 
 
भारतीय संघाने ही शर्यत ३:१८.१२ सेकंदात पूर्ण केली, ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या शर्यतीत चीन दुसर्‍या स्थानावर राहिला. चीनने ३:२०.५२ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदक जिंकले. श्रीलंका या यादीत तिसर्‍या स्थानावर राहिला. श्रीलंकेने ३:२१.९५ सेकंदात शर्यत पूर्ण करून कांस्य पदक जिंकले.
 
या विजयासह भारताने ४÷४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत आपले तिसरे पदक जिंकले. २०१९ मध्ये प्रथमच भारताचा चॅम्पियनशिपमध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी भारताने रौप्य पदक जिंकले. २०२३ मध्ये भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर आता भारताने सलग दुसर्‍यांदा सुवर्णपदक जिंकले.

Related Articles